Difference between revisions 1070798 and 1070799 on mrwiki

'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.


....................................
हा लेख आणि त्यावरील माहिती तपासली. लेखासोबत दिलेले सर्व संदर्भ तपासले. ते योग्य आहेत, असे दिसून आले. याही पुढे जाऊन हा लेख ज्या वर्गातील आहे, त्या वर्गाची म्हणजेच मराठी ब्लॉगर हा वर्गही तपासला. अनेक मराठी ब्लॉग तपासले. त्यात  असे आढळून आले की, अनेक ब्लॉगर स्वत:चे छायाचित्र लावण्याऐवजी काही तरी प्रतिकचिन्ह घेऊन त्याचे छायाचित्र वापरतात. इंग्रजीतील ब्लॉगरही ही पद्धत वापरतात असे दिसून आले आहे. विशेषत: स्त्रिया स्वत:ची छायाचित्रे टाकण्याचे टाळातत, असे दिसून आले आहे. नेटवरील छायाचित्रांचा गैरवापर होण्याचा धोका असतो, हे एक कारण त्यामागे आहे. त्यामुळे या लेखावर ‘खोटे ज्ञान पसरविण्या'संबंधी जो आरोप करण्यात आला आहे, तो चुकीचा असल्याचे स्पष्ट होते.
...........................................


ह्या लेखा मधये ज्या व्यक्तिचे सन्दर्भ् दिलेले आहेत् त्या व्याक्तिच्या असितित्वा बद्द्ल् अनेक वेळा त्याच ब्लोग वर प्रश्न्न विचार्लेले आहेत.....
आणि ब्लोग ळिहिणार्या अजुन एख्यादा व्याक्तीचे माहिती देणारे आसे कुठलेच् पान् विकिपेदिअ वर दिसले नाहिए. फोटो हा केवळ एक मुद्दा या ब्लोग वारील साहित्य यवर विविध स्तरानवरुन अनेक वेळा टिका झालेली आहे त्याबाद्दल या लेखात काहीच दिसत नाही. या वरुन हा लेख अनिता पाटिल यान्ची जाहिरात वाटतो आहे साशान्क माहीति चा प्रासार होणे चूक आहे.

==अशाने अशाने मराठी विकिपीडियाचे वाटोळे होईल==

या पानावर आक्षेप घेणारांनी खरी कारणे येथे नोंदवायला हवीत. खरी कारणे नोंदविणे गैरसोयीचे आहे, म्हणून खोटी कारणे नोंदविणे योग्य नव्हे. विकीपिडिया हे सर्व विचारांना समान व्यासपीठ देणारे साधन आहे. आपल्या मताच्या विरोधी आहे, म्हणून कोणत्याही लेखाला विरोध करता येणार नाही. अशाने अशाने मराठी विकिपीडियाचे वाटोळे होईल. 

या लेखात प्रा. हरी नरके, संजय सोनवणी, रा. रं. बोराडे आणि प्रा.रविन्द्र तहकीक यांचा संदर्भ आला आहे. पैकी श्री. तहकीक हे या ब्लॉगचे संपादक आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी संपादकपदाची धुरा सांभाळल्याचे ब्लॉगवरील नोंदींवरून दिसते. त्यांचे फेसबुक खातेही आहे. कोणाला शंका असल्यास खात्री करून घेता येईल.
[[brurthari]]

<br />
==श्री. j यांनी जतियवाद करू नये==
श्री. j यांनी या लेखाबाबत नोंदवले आक्षेप  आहेत, जातीय स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ते मी काढून टाकीत आहे. यापुढे श्री. j यांनी असे जातीय लेखन करू नये. अन्यथा, j यांनी लिहिलेल्या लेखांवर असेच आक्षेप घेतले जातील. हे त्यांनी लक्षात ठेवावे.
<br />
या पानाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, तसेच आक्षेप श्रीराम लागू, भास्करबुवा बखले, अशोक पत्की इत्यादींची माहिती देणा-या शेकडो पानांबाबत घेता येतील. वैयक्तिक अजेंडा राबविण्यासाठी कोणीही विकीचा वापर करू नये. या पानात चुकीची संपादने केल्यास, त्याची प्रतिक्रिया वरील पानांवर पाहायला मिळेल.

== उल्लेखनीयता ==

य़ा विषयाच्या उल्लेखनीयेतेबद्दल मला शंका आहे. त्यामुळे हा लेख विकिपीडियावर नसावा असे मला वाटते. [[विकिपीडिया:उल्लेखनीयता]]  येथे दिलेली सर्व साधारण विश्वकोशीय दखलपात्रता मार्गदर्शक तत्त्वे  पाहा.

त्यानुसार "If a topic has received significant coverage in reliable sources that are independent of the subject, it is presumed to satisfy the inclusion criteria for a stand-alone article."
  
:"significant coverage": याविषयावर फक्त त्यांचा स्वतःचा ब्लॉग हा एकटाच जे काही कव्हरेज करायचे ते करतो आहे. अनिता पाटील यांच्याबद्दल "मुख्यस्रोत (mainstream)" वर्तमानपत्रे, "मुख्यस्रोत (mainstream)" नियकालिके किंवा "मुख्यस्रोत (mainstream)" peer reviewed   शोधपुस्तिका इत्यादी स्रोतांमध्ये काहीच माहिती दिसत नाही.  
:"reliable source independent of the subject": अनिता पाटील यांच्या संबंधित स्वतंत्र माहिती स्रोत अस्तित्वात नाहीत.
:"secondary sources" विकिपीडियावरील लेखांसाठी त्या विषयावर दूय्यम स्रोत असणे आवश्यक असते. असे स्रोत प्राथमिक स्रोतातील माहितीची शहानिशा आणि विश्लेषन करतात. या विषयाबाबत तसे काहीच दिसून येत नाही आहे.
 
या लेखात योगदान दिलेल्या लोकांनी कृपया "reliable sources that are independent of the subject" येथे नोंदवावेत. 

आता लेखात असलेले संदर्भ पाहता हा लेख मराठी विकिपीडियावरील उल्लेखनीयतेचे निकष पार पाडत नाही.  त्यामुळे जर  [[विकिपीडिया:उल्लेखनीयता]] वरील निकष पार पाडणारे संदर्भ मिळाले नाहीत तर हे पान काढून टाकण्यात यावे.

- [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २२:३३, २१ ऑक्टोबर २०१२ (IST)
:: नमस्कार राहुल,

::कोल्हापुरींच्या आगमनाने प्रचालक गोटात नव चैतन्याची लाट आलेली दिसते आहे, प्रचालक गटातील सदस्य अचानक आपल्या नावाने तसेच वेगवेगळ्या नावाने कार्यरत झालेले आहेत.
::[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २३:३४, २१ ऑक्टोबर २०१२ (IST)
=='दै. लोकसत्ते'चा दुवा पाहून घ्यावा==
श्री. पुणेरी पुणेकर दै. लोकसत्तामध्ये  "वाचावे नेटके" या सदरात अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर लिहून आले आहे. या सदराचा दुवा पानाला जोडला आहे. पाहून घ्यावा. 
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १५:४०, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)

==राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पान विकीवर राहू शकत असेल, तर अनिता पाटील यांचे पान का राहू शकत नाही?==

अनिता पाटील यांच्या ब्लॉगची माहिती देणारे पान काढून टाकण्यासाठी काही ब्राह्मण विकीसदस्य सध्या जीवाचा आटापीटा करीत आहेत. जाहिरात, पानाचे औचित्य आदी कारणे त्यासाठी हे लोक देत आहेत. हीच कारणे लावली तर संपूर्ण मराठी विकीपिडीया रिकामा करावा लागेल. मराठी ब्लॉगर या साच्याखाली अनेक ब्लॉग लेखकांची पाने तयार होताना दिसत आहेत. मात्र, त्यापैकी केवळ अनिता पाटील यांच्या पानालाच ब्राह्मण सदस्य का आक्षेप घेत आहेत? प्रचालकांनी अशा सदस्यांवर कारवाई करायला हवी. अन्यथा ब्राह्मण जातीतील लोकांची माहिती देणाऱ्या विकी पानांबाबत असेच आक्षेप बहुजन समाजातील विकीसदस्यांकडून नोंदविले जातील. प्रत्येक गावातून एक बहुजन सदस्य कामाला लागला तर विकीचा बट्ट्याबोळ व्हायला वेळ लागणार नाही. <br />

प्रचालकांनी ब्राह्मणी जातीयवाद तात्काळ रोखावा, अशी माझी विनंती आहे. <br />

[[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] पान विकीवर राहू शकत असेल, तर [[अनिता पाटील]] यांचे पान का राहू शकत नाही? या प्रश्नाचा प्रचालकांनी विचार करावा. <br />

[[सदस्य:Brurthari|Brurthari]] १७:२२, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)

::तर या लेखाबाबत मुख्यस्रोत लोकसत्ता या वर्तमानपत्रातील ब्लॉग संबंधीच्या "वाचावे नेटके" या लेखात अनिता पाटील यांच्या ब्लॉगची माहिती आहे.  ते त्याबद्दल काय लिहितात पाहा: '  ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ हेच सत्य असल्याचा आग्रह अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरच्या अनेक (बहुतेक) नोंदींचा पाया आहे. ‘ब्राह्मण गोमांस खात होते’ हा ‘द होली काऊ’ यांसारख्या पुस्तकात आधीच अभ्यासूपणे ग्रथित झालेला दावा अनिता पाटील यांनी ब्लॉगलिखाणात अशा प्रकारे केला आहे की तिरस्कार ही भावनाच लिखाणात प्रबळ होते आहे, याची खात्री वाचकाला पटावी.'
::यातून खालील गोष्टी पुढे येतात
::१. या लेखासाठी मुख्यस्रोतातील एका वर्तमानपत्रात एका सदरातील ४० पैकी ५ वाक्ये  माहिती आहे. आता एवढी माहिती म्हणजे [[विकिपीडिया:उल्लेखनीयता]] येथील "Significant coverage" means that sources address the subject directly in detail, and no original research is needed to extract the content. Significant coverage is more than a trivial mention but it need not be the main topic of the source material." या निकषाला धरून आहे का? माझ्यामते एका वर्तमानपत्रातील एका सदरातील ४० पैकी ५ वाक्ये  माहिती जी अनिता पाटील यांच्यावरील टिका आहे  "significant coverage" असू शकत नाही.
::२. आता [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता#नोंदी]] येथील मुद्दा ३ पहा.  ते म्हणतायत "In the absence of multiple sources, it must be possible to verify that the source reflects a neutral point of view, is credible and provides sufficient detail for a comprehensive article." माझ्यामते एका वर्तमानपत्रातील एका सदरातील ४० पैकी ५ वाक्ये  माहिती जी अनिता पाटील यांच्यावरील टिका आहे "sufficient detail for a comprehensive article." असू शकत नाही.
::३. [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता#नोंदी]]  येथील मुद्दा ४ पहा. "Lack of multiple sources suggests that the topic may be more suitable for inclusion in an article on a broader topic. Mere republications of a single source or news wire service do not always constitute multiple works." म्हणजे हा लेख फारतर दुसऱ्या बृहद विषयावरील लेखातील एक छोटासा भाग म्हणून ठीक आहे. स्वतंत्र लेख म्हणून तो ठेवणे योग्य नाही.
::४.   [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता#नोंदी]]  येथील मुद्दा ५ पहा. "Works produced by the subject, or those with a strong connection to them, are unlikely to be strong evidence of interest by the world at large. See also: Wikipedia:Conflict of interest for handling of such situations." म्हणजेच अनिता पाटील किंवा त्यांच्या बरोबर काम करणाऱ्यांनी लिहिलेला ब्लॉग म्हणजे सर्वांना त्यांच्या कामात रस आहे असे म्हणता येणार नाही.
::हे सर्व मुद्दे ध्यानात घेता हा लेख काढून टाकावा ही प्रचालकांना विनंती आहे.
::जर [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] पान किंवा विकिपीडियावरील कोणतेही इतर लेख  या लेखासारखेच [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता]] येथील निकष पार पडत नसतील तर ते लगेच काढून टाकण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.
::तसेच  श्री. Brurthari यांनी  "प्रत्येक गावातून एक बहुजन सदस्य कामाला लावून"    [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता]]  वरील कोणते निकष कोणते लेख पार पाडत नाहीत याचे मुद्देसूद विश्लेषण (जसे मी अनिता पाटील या लेखासाठी करण्याचा प्रयत्न केला आहे  तसे) केल्यास विकिपीडियावरील कमी दर्जाचे लेख कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे त्यांनी तसे करावे ही आवर्जून विनंती.
::- [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) १९:३५, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

==प्रथम रामदासांचे आणि संघाचे पान काढा मग अनिता पाटील यांचे काढा==   
श्री.पुणेरीपुणेकर, तुम्ही वर जी नियमावली टाकली आहे. ती आम्हाला पूर्ण मान्य आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की, ही नियमावली सर्वच लेखांना लावावी लागेल. या नियमावलीचा वापर करून आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समर्थ रामदास स्वामी यांची पाने आपण विकिपीडियावरून काढू या. नंतर अनिता पाटील यांचे पान काढू या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समर्थ रामदास स्वामी ही पाने विकिपीडियावर ठेवण्यामागील उल्लेखनीयता काहीच नाही, असे लोकांचे ठाम मत आहे.<br />
-[[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १७:१७, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)


नमस्कार पुणेरीपुणेकर/झाडाझडती/साफ सफाई/मंदार/राहुल/शतंनु तसेच विकि चौकटी बाहेरचे इतर विचारवंत सुधान्वा ई.ई.,

आता तुम्ही सर्व प्रचालक गोटातील असल्यामुळे तुमच्या एवढी माहिती मला नाही मान्य पण माझे काही मुद्दे,
* अनिता पाटील बद्दल तुमचे, तुमच्या गटाचे  मत ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ करणारी व्यक्ती असा आहे. त्यामुळे तुम्हाला अनिता पाटील लेखाच्या उल्लेखनियते विषयी शंका आहे.
* जर तुमचा मुद्दा ग्राह्य धरला तर खालील लेखां बाबत आपले मत स्पष्ट करावे,
** विनायक दामोदर सावरकर - गांधी हत्या कटातील आरोपी (निर्दोश मुक्त मान्य), पण बऱ्याच जनांने (विचार चुकीचे असतील तुमच्या प्रमाणे)  ते अजुनही आरोपी वाटतात.
** दादोजी कोंडदेव - बरेच जण त्यांना शिवाजी महाराजांचे गुरू मानतच नाहीत, असे असेल तर मग दादोजी कोंडदेवची काही उल्लेखनियताच नाही. 

''लेखन चालू''

[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २०:०२, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)
:श्री. Mrwiki reforms,
:तुमचे लेखन चालू आहे पण तुमचा थोडा गैरसमज झाला आहे म्हणून हे लिहितो आहे.
:तुम्ही लिहिले आहे,  "अनिता पाटील बद्दल तुमचे, तुमच्या गटाचे  मत ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ करणारी व्यक्ती असा आहे. त्यामुळे तुम्हाला अनिता पाटील लेखाच्या उल्लेखनियते विषयी शंका आहे." तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे "हा समाज विरूद्ध तो समाज" असे लोकसत्तामधील लेखात लिहिले आहे. माझे त्यावर काहीच मत नाही, ते फक्त मी उद्धृत केले आहे. माझे जे काय म्हणणे आहे ते मुद्दा १ ते ४ यात लिहीले आहे त्यात ते का उल्लेखनीय नाही याची कारणे दिली आहेत, ती कारणे जरी लोकसत्ताने त्याच ठिकाणी आणि तेवढेच कौतुक केले असते तरी लागू आहेत. उल्लेखनीयता त्यांनी टीका केली की कौतुक केले यावर जास्त अवलंबून नाही ती आहे टिका किंवा कौतुक किंवा शहानिशा किंवा विश्लेषण किती विश्वसनीय(दर्जा आणि संख्या दोन्ही) सूत्रांनी केले आणि त्याला किती महत्त्व दिले याला आहे. बाकी सावरकर, दादोजी कोंडदेव हे लेख या लेखाप्रमाणेच जर  [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता]] येथील निकष पार पडत नसतील तर ते लगेच काढून टाकण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्याची चर्चा त्यांच्या चर्चापानावर करावी एवढीच विनंती. 
:- [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २२:४०, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

श्री. Mrwiki reforms यांचे म्हणणे अगदी योग्य आहे.  सावरकर, कोंडदेव ही पाने वादग्रस्त आहेत. ती काढून टाकायला हवीत. - [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:५०, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)

== चर्चा पानावरील संपादने ==

कोणत्याही चर्चा पानावर लिहीत असताना आधीचा मजकूर बदलू किंवा खोडू नये.

[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:५१, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

==लेखातील चित्र हलविले==

अभय नातू यांनी [[अनिता पाटील]] या लेखातील चित्र हलविले आहे. लेखात व्यक्तीचे चित्र अपेक्षित आहे, असे नातू यांचे म्हणणे आहे. नातू यांचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे. तथापि, हा नियम फक्त अनिता पाटील यांच्या लेखालाच लागू करता येणार नाही. तो इतरत्रही लावावा लागेल. याच नियमानुसार मी [[समर्थ रामदास स्वामी]] या लेखातील चित्र हलविले आहे. रामदासाचे म्हणून जे चित्र लेखात टाकले गेले आहे, ते रामदासांचेच आहे, याला काहीही पुरावा नाही. त्यामुळे ते रामदासांचे म्हणून टाकता येणार नाही. <br />

आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, रामदास संन्यासी होते. संन्याशाच्या गळ्यात जानवे नसते. रामदासांच्या या चित्रामध्ये मात्र त्यांच्या गळ्यात जानवे चितारलेले आहे.  त्यामुळे हे चित्र रामदासांचे आहे, असे गृहीत धरता येत नाही. बनावट चित्र लेखासोबत असू नये, म्हणून मी ते हलविले आहे.<br /> 

संन्यास घेतल्यानंतर पूर्वायुष्याची कोणतीही ओळख शिल्लक राहू नये, यासाठी बाह्य चिन्हांचा त्याग करण्याचा नियम आहे. म्हणून जानवे, कडदोरा वगैरे चिन्हे काढली जातात. <br />
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:२४, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
:बृतहरी, रामदास स्वामी व अनिता पाटील ह्यांची जर तुम्ही तुलना करणार असाल तर तुमच्यासोबत logical reasoning करण्यात काहीच अर्थ राहत नाही. कोणी काहीही मुद्दा काढला की तुम्ही जातीयवादाचा सूर काढणार हे नक्की. उगाच काही तरी वाद उकरून काढायचा असा अट्टाहास हल्ली येथील अनेक नव्या सदस्यांनी चालवला आहेच (किंबहुना भांडण्यासाठीच अनेक सदस्यांनी खाते तयार केले आहे) त्यात तुमचे पण नाव जोडायला हवे. रामदास स्वामींच्या लेखामध्ये आपण केलेले बदल मी परतवले आहेत. तुम्ही जर खरंच येथे काही constructive करायला आला आहात तर ह्या गोष्टींचा कीस न पाडता लेखांमध्ये भर घालाल अशी अपेक्षा आहे. नाही तर तुमची मर्जी. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २२:०१, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

==ब्राह्मणांना सोयीची विचारधाराच विकिपीडियावर राहील, असे धोरण तुम्ही ठरवून टाकले आहे==
श्री अभिजित साठे,<br />
तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. अनिता पाटील आणि रामदास स्वामी यांची होऊ शकत नाही. खरे म्हणजे, जगातील कोणत्याही दोन व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. अभिजित साठे आणि भृर्तहरी यांचीही  तुलना होऊ शकत नाही. <br />

हीच बाब विचारधारांचीही आहे. दोन विचार धारांची तुलना होऊ शकत नाही. पण ते तुम्हाला आणि तुमच्या चेल्या चपाट्यांना मान्य होत नाही, असे दिसते. अनिता पाटील ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात, ती विचारधारा तुम्हाला विकिपीडियावर दिसायलाच नको आहे. ब्राह्मणांना सोयीची विचारधाराच विकिपीडियावर राहील, असे धोरण तुम्ही ठरवून टाकले आहे. त्यामुळेच अनिता पाटील या पानाला विरोध होत आहे, या पानाला वारंवार टॅग लावले जात आहेत. <br />

अनिता पाटील हे पान ब्राह्मणांना खटकत असेल, तर आम्हालासुद्धा रामदास स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरची पाने खटकतात. अनिता पाटील यांचे पान काढले जाणार असेल, तर ही पानेही काढली जायला हवीत. काढून टाकणयाजोगी इतरही अनेक पाने आहेत. पण त्यांची यादी मी नंतर देईन. <br />

तुम्ही जातीयवादी भूमिका घेणार असला, तर आरोप हे होणारच. तुमची भूमिका निरपेक्ष आहे, हे कृतीतून दिसू द्या. <br />

: अत्यंत महत्त्वाचे : <br />
श्री अभिजित साठे, रामदासांच्या लेखातील बदल परतवण्यासाठी तुम्ही जी तत्परता दाखविली ती अनिता पाटील या लेखातील बदल परतवण्यासाठी दाखविली असती, तर बरे झाले झाले असते. तुमची भूमिका जातीय नाही, हे त्यामुळे सिद्ध झाले असते. तथापि, तशी तत्परता तुम्ही दाखविली नाही. याचाच अर्थ अनिता पाटील यांच्या विचारधारेच्या बाबतीत तुमच्या मनात अढी आहे. म्हणून मी अनिता पाटील या लेखातील बदल परतवत आहे. <br />
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:४५, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)

==पुणेरीपुणेकर यांचा जातीयवाद==

[[अनिता पाटील]] हे पान विकिपीडियावरून काढण्यासाठी पुणेरी पुणेकर यांनी ब्राह्मणवाद चालविला आहे. पुणेकर हे संघाचे एजंट आहेत काय? [[अनिता पाटील]] या पानाला त्यांच्या ब्लॉगखेरीज कोणताही आधार नाही, असा दावा पुणेरीपुणेकर हे करीत आहेत. तो अक्षरश: खोटा आहे. कोणाही नि:पक्ष व्यक्तीने anita patil blog असा सर्च गुगलवर देऊन पाहावा. म्हणजे या [[ब्राह्मणवाद|ब्राह्मणवाद्याचा]] खोटेपणा लक्षात येईल. आज दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४० वा. मी गुगलवर सर्च दिला तेव्हा ३,४१००० (तीन लाख चाळीस हजार) परिणाम मिळाले. 

हा लेख [[अनिता पाटील]] या व्यक्तीविषयी नसून त्यांच्या ब्लॉगविषयी आहे. त्यामुळे त्यांच्या ब्लॉगचे संदर्भ लेखात सर्वाधिक येणार, एवढी साधी गोष्टही पुणेरी पुणेकर यांच्या डोक्यात जात नाही. 

विकीपीडियावर इतरही अनेक ब्लॉग लेखकांची पाने आहेत. पण ती पाने काढून टाका, असे पुणेरीपुणेकर म्हणत नाहीत. कारण हे ब्लॉग ब्राह्मणी विचारधारेला पुरक आहेत. अनिता पाटील हा ब्लॉग [[ब्राह्मणवाद|ब्राह्मणवादी]] विचार धारेला विरोध करतो, म्हणून तो काही ना काही कारण दाखवून काढा, असा लकडा विकिपीडियावरील ब्राह्मणांनी चालविला आहे. 
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १७:५०, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)
:श्री. brurthari,
:तुमचाही काहीतरी गैरसमज झाला आहे. अनिता पाटील यांच्यावरील लेख त्यांचे लेखन कोणत्या एका जातीविरुद्ध आहे म्हणून काढण्याची विनंती करत नाही आहे मी तो काढण्याची विनंती करत आहे कारण तो उल्लेखनीय नाही आहे म्हणून. त्याची कारणे मुद्देसूदरीत्या मी वर मांडलीही आहेत. तुम्ही जर त्याला  मुद्देसूदपणे उत्तरे दिली आणि मुख्यस्रोतातील आणखी कोणतेही संदर्भ दिले ( तीन लाख चाळीस हजार मध्ये तुम्हाला सापडतीलच) आणि ते संदर्भ [[विकिपीडिया:उल्लेखनीयता]] येथील निकष पार पाडत असतील तर हा लेख इथेच ठेवण्यात माझी हरकत नाही.
:बाकी  मी आता '''तिसऱ्यांदा''' सांगतो की  [[विकिपीडिया:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]] नसलेले सर्वच लेख काढण्यासाठी माझा तुम्हाला पाठिंबा आहे. जर असे इतर ब्लॉगलेखकांविषयीचे लेख [[विकिपीडिया:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]] वरील नियमांना धरून नसतील तर तेही काढावेच. त्याशिवाय मराठी विकिपीडियाचा दर्जा सुधारणार नाही हे नक्की. 
:गुगलवर "anita patil blog" (अवतरण चिन्हांसह शोधल्यास असंबंध परिणाम गाळले जातात) ५ परिणाम मिळाले एकही  [[विकिपीडिया:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]] सिद्ध करणारा नाही आहे., "anita-patil.blogspot.com" शोधल्यास १५९० परिणाम मिळाले त्यातील ९ व्या पानावरील लोकसत्ताचा परिणाम सोडल्यास बाकी एकही  [[विकिपीडिया:उल्लेखनीयता|उल्लेखनीयता]] सिद्ध करणारा परिणाम मिळाला नाही. माझी पाहण्यात चूक झाली असलीतर कृपया ती दाखवा.
:शिवाय मी उचललेल्या मुद्द्यांचे उत्तर तुम्ही माझ्यावर जातीयवादाचा आरोप करून मिळणार नाहीत असे वाटते. माझ्या किंवा तुमच्या जातीयवादाची चर्चा आपण करू शकतो पण ती या पानावर न करता आपआपल्या चर्चा पानांवर करू. येथे फक्त या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल चर्चा करणे मला योग्य वाटते.
:- [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) १९:४०, २५ ऑक्टोबर २०१२ (IST)

==श्री. पुणेरीपुणेकर तुमचा काही तरी गैरसमज झालेला आहे==
श्री. पुणेरीपुणेकर, तुमचा काही तरी गैरसमज झालेला आहे. अनिता पाटील हे पान काढायला आमचा विरोध नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे की, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि [[समर्थ रामदास स्वामी]] या पानांनासुद्धा कोणतीही उल्लेखनीयता दिसून येत नाही. मी स्वत: ही दोन्ही पाने तपासली आहेत. ती पूर्णत: निरर्थक असल्याचे मला दिसून आले आहे. ही दोन्ही पाने तात्काळ काढण्यात यावी. त्यानंतर लगेच अनिता पाटील हे पान काढण्यात यावे. अशा प्रकारे नि:पक्ष निर्णय झाल्यास तो सगळ्यांना स्वीकारार्ह राहील. तुम्हाला उल्लेखनीयता ठरविण्याचा जसा अधिकार आहे, तसा तो आम्हालाही आहेच की. <br />

महत्त्वाचे म्हणजे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि [[समर्थ रामदास स्वामी]] ही वादग्रस्त पाने काढून टाकल्यास वाद मिटेल. इतर कामांकडे लक्ष वळविता येईल.  आणखी कोणती "उल्लेखनीयता" नसलेली पाने आहेत, त्यांचा शोध घेता येईल. आपण दोघे मिळून हा शोध घेऊ या.  <br />

[[अरुण शौरी]] हे आणखी एक नवे पान मला आज उल्लेखनीयेशिवाय दिसून आले. त्याला मी उल्लेखनीयतेचा टॅग लावला आहे. कृपया पाहून घ्यावे.<br />
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १७:५०, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)