Difference between revisions 2070397 and 2122947 on mrwiki

{{पानकाढा | कारण = दीर्घकाळ रिकामे पान/अविश्वकोशीय मजकूर}}
{{ विकिकरण}}
शेती आणि पशुपालन घटकः ५  इयता: ३ री विषयः इतिहास 
 संयोजकः लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक) 
 विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०1.
    
       मातीत बी पेरले की,रोप उगवते ,हे आपल्याला माहीत आहे .
पण अश्मयुगातील माणसाला सुरुवातीला हे माहीत नव्हते .
(contracted; show full)पाळीव प्राणी म्हणतो. माणूस या प्राण्यांची धेखाभाल करू लागला.
काळजी घेऊ लागला.
    माणसाला शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी कुत्र्याचा 
उपयोग होऊ लागला.शेतीच्या कामात बैलाचा उपयोग होऊ 
लागला.माणूस काही पाळीव प्राण्यांचे मांस खात असे.त्यांच्या 
कातडीचा माणसाला कपड्यांसाठी उपयोग होत असे.उबदार 
कपड्यांसाठी मेंढ्यांची लोकर उपयोगी पडत असे.बैल,गाढव,
घोडा,उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुक
िसाठीही करून 
घेतला.
    माणूस आता प्राण्यांच्या मदतीने शेती करू लागला. त्यामुळे 
अधिक जमीन लागवडीखाली आणता आली. मोठ्या प्रमाणात 
पिके घेणे शक्य झाले.माणूस धान्य साठवू लागला त्याला 
आता भटकंती करण्याची गरज उरली नाही .तो शेताजवळ घरे 
बांधून राहू लागला. अनेक कुटुंबे ,त्यांची घरे आणि शेते मिळून 
गाव तयार झाले.लोकवस्ती वाढू लागली.गावे मोठी होऊ 
लागली.शेतीमुळे माणसाला राहण्याच्या पद्धतीत खूप बदल 
घडून आला.
उपक्रम:-तुमच्या घरातील कुंडीत किंवा परसबागेत दाणे टाका व खालील 
गोष्टींचे निरीक्षण करा.
अंकुर फुटणे,रोप वाढणे,पाने फुटणे.

[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरित करावयाचे लेख]]