Revision 1007599 of "भटकंती विषय: इतिहास घटक: ३ इयता: ३ री" on mrwiki

भटकंती  विषय: इतिहास घटक: ३ इयता: ३ री
 संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक) 
 विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
    
  अश्मयुगातील माणूस सुरवातीला जंगलात राहायचा .इतर 
प्राण्यांप्रमाणे तो सुद्धा भटकत असायचा .
निवाऱ्यासाठी माणूस झाडाझुडपांत आश्रय घेत असे.कधी 
तो पाण्याजवळ असलेल्या गुहांमध्ये राहत असे,कारण 
जगण्यासाठी माणसाला पाणी आवश्यक आहे.
भूक लागल्यावर अश्मयुगातील माणूस काय बरे खात 
असेल ? तो झाडांवरची फळे तोडायचा .काठीने किंवा दगडी 
अवजाराने जमीन उकरून कंदमुळे काढायचा .निसर्गात जो मिळेल 
ते तो खायचा .

     माणूस मांस आणि मासेसुद्धा खात असे. लहानसहान 
प्राण्यांची शिकार करणे त्याला सोपे जाई. मोठे प्राणी मारायचे 
तर ते मात्र एकट्यादुकट्याला शक्य नसे. अशा वेळी एकमेकांच्या 
मदतीने माणसे शिकार करत. त्यासाठी माणसे नवनव्या युक्त्या 
वापरत.

     माणसाच्या अंगावर केसाळ प्राण्यान इतके दाट केस नसतात 
आणि त्यांची कातडीही जाड नसते. थंडी, वारा, ऊन, पाऊस
यांचा त्रास होऊ नये म्हणून माणसाला कपडे लागतात. अश्मयुगात 
रानोमाळ भटकणारा माणूस कोणते बरे कपडे वापरत असेल ? 
माणूस सुरवातीला झाडांच्या साली, पाने किंवा जनावरांची 
कातडी अंगाभोवती गुंडाळत असे . कातडी किंवा झाडांच्या साली 
एकत्र जोडाव्या लागत . हे त्याने कसे केले असेल ?

   त्यासाठी त्याने हाडाच्या दाभाणाचा उपयोग केला. चिवट 
वेल, गवताची दोरी , चामड्याची वादी अशा गोष्टींचा त्याने 
दोऱ्यासारखा वापर केला.

   भटक्या अवस्थेत माणसे टोळ्या करून राहत असत .
त्यामुळे अन्न मिळवण्याचे काम सोपे होत असे . अन्न शोधण्यासाठी 
माणसांच्या टोळ्यांची भटकंती चालू असे . एका ठिकाणाचे अन्न 
कमी पडू लागले , पाण्याचा तुटवडा जाणवू लागला , की या 
टोळ्या दुसऱ्या जागी जात .

     टोळीमध्ये एकत्र राहण्याचे आणखी काही फायदे झाले .
टोळीतील लोकांना संरक्षण मिळाले .लहान मुलांचे अधिक चांगले 
पालनपोषण करणे शक्य झाले . टोळीतील मोठ्या माणसांचे 
अनुकरण मुले करत असत . त्यामधून त्यांना अवजारे तयार करणे ,

    शिकार करणे यांसारख्या गोष्टी शिकता येऊ लागल्या .
काही वेळ भटकंती करणाऱ्या दोन टोळ्यांची गाठ पडत 
असे . त्यांची भांडणे होत असत , तर कधी मैत्री होत असे . त्यातून 
दोन्ही टोळ्यांतील लोकांना एकमेकांच्या अनुभवांचा फायदा होत 
असे . नव्या अवजाराची माहिती मिळत असे . नव्या कला शिकता 
येत .शिकारीच्या व राहण्याच्या वेगळ्या पद्धती समजत. त्यातून 
त्यांची आणखी प्रगती होत गेली .
उपक्रम :- आपण वापरत असलेल्या कपड्याची यादी ऋतू प्रमाणे तयार करा .
उन्हाळा :-...................................................................
पावसाला :-.................................................................
हिवाळा :-...................................................................