Revision 1012305 of "रामदास स्वामींचे अभंग" on mrwiki

१) रात्रंदिवस मन राघवी असावे । चिंतन नसावे कांचनाचे। 

कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन । जन्मासी कारण ही ची दोन्ही । 

दोन्ही नको धरू नको निंदा करू । तेणे हा संसारू तरसील । 

तरसील भवसागरी बुडता । सत्य या अनंताची नामे । 

नामरूपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संत संग धरा । ।


२) येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥

काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥

काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥

काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥

धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥

काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥

रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥


३) रत्नजडित सिंहासन । वरी शोभे रघुनंदन ॥१॥

वामांकीं ते सीताबाई । जगज्जननी माझी आई ॥२॥

पश्चाद्भागीं लक्षुमण । पुढें अंजनीनंदन ॥३॥

भरत शत्रुघन भाई । चामरें ढाळिती दोन्ही बाहीं ॥४॥

नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ॥५॥

देहबुद्धि नेणों कांहीं । दास अंकित रामापायीं ॥६॥


४)ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें ॥१॥

राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥

रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी ॥३॥

तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले ॥४॥

कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी ॥५॥

रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं ॥६॥


५)काय रे निष्ठुर रामा ।सोडुनी जातोसी आम्हा ।
तुजविणे गुणधामा कंठवेना ॥ध्रु॥

तुझीया वियोगे जाण । मी न ठेवी प्राण ।
लटिके केली तरि आण । मजला तुझी ॥१॥

धनु भंगीले हेळा । वरिली जनकबाळा ।
तया मार्गीचा सोहळा । वनवासी ॥२॥

रामी रामदास भाव । बंदी पडले ते देव ।
सर्व सांडुनिया धाव । घातली रामें ॥३॥


आपल्या मातेसाठी समर्थांनी एका अभंगाची रचना केली.  .

 

होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी ।

लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥

 

जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी ।

ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥

 

मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी ।

पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥

 

जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले ।

वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥

 

जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला ।

धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥

 

पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी ।

मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥

 

चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।

सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥

 

सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन ।

तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥

 

रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण ।

तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥

 

सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।

रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥



६)हनुमंत  आमची कूळवल्ली | राम मंडपा वेला गेली |श्रीरामभक्तीने  फळली | रामदास बोले या नावे ||

आमुचे कुळी हनुमंत | हनुमंत आमुचे मुख्य दैवत |तयावीण अमुचा परमार्थ | सिद्धीते न पवे सर्वथा ||

 

साह्य आम्हासी हनुमंत | आराध्यदैवत  श्रीराघुनाथ |श्रीगुरू श्रीराम समर्थ | काय उणे दासासी ||

दाता एक रघुनंदन | वरकड लंडी देईल कोण |तया सोडोन आम्ही जन | कोणाप्रती मागावे ||

म्हणोनि आम्ही रामदास | श्रीरामचरणी आमुचा विश्वास |कोसाळोनि  पडो हे  आकाश | आणिकाची वास न  पाहू ||

स्वरूपसांप्रदाय अयोध्यामठ | जानकीदेवी श्रीराघुनाथ दैवत |मारुती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी ||

स्वधामासी जाता महा रामराजा | हनुमंत तो ठेविला याची काजा |सदासर्वदा रामदासासी पावें | खळी गांजीता ध्यान सांडोन धावे ||
 



{{वर्ग}}